Skip to main content

Posts

रमेश प्रभू, खिशातले राजीनामे आणि महिला आरक्षण विधेयक

१६ ते १८ एप्रिल दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते, ज्यामध्ये महिला आरक्षण विधेयकाची चर्चा झाली. विधेयक पारित व्हायला दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता होती, जे अर्थातच सरकारकडे नसल्यामुळे विधेयक पारित झाले नाही. या सर्व घटनांचा, पूर्वी घडलेल्या घटनांच्या आधारे धांडोळा घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बंगालच्या निवडणुकांपूर्वी मुद्दाम मोदींनी हे विधेयक संसदेत आणले आणि हाणून पडू दिले जेणेकरून बंगालच्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा त्यांना उचलता येईल असा कयास राजकीय पंडितांकडून वर्तवला जात आहे. एक प्रकारे महिला आरक्षण विधेयकावर मते मिळतात की नाही हे बंगालच्या निवडणुकांमधून भारतीय जनता पक्षाला चाचपून बघायचे आहे असे विश्लेषकांचे मत आहे.  हे घटनाचक्र बघितले असता १९८७ मध्ये झालेल्या विलेपार्ले येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आठवण येते. या निवडणुकीत सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांनी "गर्व से कहो हम हिंदू है" अशी घोषणा दिली होती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मिळतात की नाही हे बाळासाहेबांना चाचपून बघायचे होते आणि त्यासाठीच त्यांनी विलेपार्ले येथील पोटनिवडणुकीवर त्याचा प्रय...
Recent posts

कधी बहर कधी शिशिर

 डिसेंबर २०२४ मधली घटना आहे. महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपुरातल्या राजभवनाच्या हिरवळीवर पार पडला होता. पण, या नव्या मंत्रिमंडळात गेल्या वीस वर्षांपासून हमखास असलेले एक नाव मात्र नव्हते.  दुसऱ्या दिवशी या मंत्रिमंडळात वगळल्या गेलेल्या नेत्याने पत्रकारांशी बोलताना तीव्र नाराजी, दुःख आणि आपली खदखद व्यक्त केली. "जहाँ नहीं चैना, वहाॅं नहीं रहना" असं हा नेता बोलला.  आतापर्यंत आपल्या लक्षात आलंच असेल हा नेता कोण. कालांतराने म्हणजेच ५-६ महिन्यानंतर भुजबळ पुन्हा एकदा मंत्री झाले. हे सगळं आता आठवण्याचं कारण म्हणजे अजितदादा पवार यांच्या निधनानंतर घडलेल्या घटना आहेत.  अजितदादांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांना तातडीने जे शिष्टमंडळ भेटलं त्यात भुजबळ देखील होते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे या अजित पवारांच्या मर्जीतल्या शिलेदारांसोबत भुजबळ देखील दिसले. विधिमंडळ गटनेत्याची निवड कधी होईल वगैरे पत्रकारांना माहिती देखील भुजबळांनी दिली.  वर्षभरापूर्वी पक्ष सोडण्याची भाषा करणारे भुजबळ अजितदादांच्या मृत्यूनंतर आघाडीच्या नेत्यांपैकी एक दिसत होते. सत्त...

नियतीचा क्रूर खेळ आणि रंगलेला कलगीतुरा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवार दि. २८ जानेवारी ला निधन झाले. स्वाभाविकच, राजकीय मतं विसरून लोकांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली. माध्यमांच्या समोर सतत येणाऱ्या सुप्रिया सुळे, रोहित पवार यांना पाहिले असता अशी शंका येत होती की आता पवार कुटुंबातीलच कोणीतरी म्हणजे मुख्यत्वे सुप्रिया सुळे याच दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची धुरा सांभाळतील. सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी पक्षातल्या काही नेत्यांनी अशी विधानं देखील केली की, दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशी अजितदादांची इच्छा होती. या सर्व घटनांना आता एक दोन दिवस उलटून गेलेत आणि आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी बातमी आली.  दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री या विषयाच्या संदर्भात एक प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस हे तोलून मापून बोलणारे आहेत त्यामुळे त्यांचं बोलणं नेहमीच लक्षवेधक असतं. ते म्हणाले, महाराष्ट्र सरकार म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्णपणे पाठीशी उभे राहू. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष" असा स्पष्ट उल्लेख त्यांनी आपल्या बोलण्यात केला. माझी रा...

नाकावरच्या रागाला औषध काय!

८० आणि ९० च्या दशकात जन्माला आलेल्या कुठल्याही मराठी मुलाला अशोक सराफ हे नाव माहिती नाही हे शक्य नाही. कारण, शनिवार – रविवारी लागणारे त्यांचे चित्रपट पहातच ही पिढी मोठी झाली आहे. महामहीम राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्कार स्वीकारताना पाहून सर्वांना अतिशय आनंद झाला.  त्यांच्या अनेक भूमिकांपैकी मला अत्यंत आवडलेली भूमिका म्हणजे "कळत नकळत" या चित्रपटातला त्यांनी साकारलेला "सदा" अर्थात् "सदूमामा". हा चित्रपट स्मिता तळवलकर यांची निर्मिती होती. ही चित्रपटातली सहाय्यक भूमिका आहे. नायिकेचा भाऊ म्हणजेच नायिकेच्या मुलांचा पापड लोणची विकणारा मामा अशी ही भूमिका आहे. म्हणजेच या भूमिकेत ग्लॅमरस असं काहीही नाही. पण, तरी देखील हा चित्रपट म्हंटला की सदा आठवतो.  एखादा कुशल माणूस कसा एखाद्या कामाचं सोनं करतो हेच यातून आपल्याला दिसतं.   या सदाच्या बहिणीचा संसार मोडतो का काय अशी परिस्थिती आहे, त्याची त्याला चिंता आहे, तो संसार टिकावा अशी त्याची ईच्छा आहे पण नवरा बायकोचं भांडण असल्यामुळे त्याला काही बोलता पण येत नाही अशी परिस्थिती आहे. हे सगळं त्यांनी ज्या प्रकारे आ...

दोन अभिरुचीसंपन्न कार्यक्रम

साहित्य, संगीत, चित्रपट, शिल्पकला या माणसाला सौंदर्यदृष्टी देणाऱ्या आणि म्हणूनच माणूस म्हणून श्रीमंत करणाऱ्या गोष्टी आहेत.  जगभरात या सर्व क्षेत्रात नवनवे प्रयोग केल्या गेले आणि त्यातून उत्तम कलाकार आणि कलाकृती घडत गेल्या. या सगळ्या मंथनातून मग आपल्याला ब्रिटिश रंगभूमीवर benedict cumberbatch किंवा Olivia Colman सारखे नट पाहायला मिळतात.  मराठीत तर या सगळ्या प्रयोगांचा सुकाळ. संगीतनाटक मग त्यात वेगवेगळ्या रागातल्या घेतलेल्या चिजा, ती सादर करण्याची बालगंधर्वांसारख्या नटानी बदललेली पद्धत या सगळ्या गोष्टी आम्हाला अर्थातच श्रीमंत करून गेल्या. चांगलं काय वाईट काय, त्यातून घ्यायचं काय, टाकायचं काय हे कलासृष्टीला आणि रसिकांना सुद्धा उत्तम समजतं. म्हणूनच मग एखाद्या गोष्टीची dark side जास्त दिसणाऱ्या विजय तेंडुलकरांना बरोब्बर "सिंहासन" सारख्या चित्रपटाची पटकथा लिहिण्याचं चपखल काम दिल्या जातं आणि तो प्रयोग अर्थातच यशस्वी होतो. या सर्व गोष्टी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात अर्थातच नोंदवल्या जात असतील. पण, या सर्व अनुभवांना, प्रयोगांना एका मालिकेच्या, मुलाखतीच्या रूपात चित्रीत करून रसिकांना आ...

उत्कृष्ट संवादांचे उत्कृष्ट नमुने

राॅनी स्क्रीववाला हे भारतातले एक यशस्वी उद्योजक आहेत. शिक्षणक्षेत्र, कला, दूरचित्रवाहिनी या क्षेत्रात त्यांनी अनेक यशस्वी उद्योग उभे केले आहेत. या स्क्रीववाला यांनी मध्यंतरी एक पुस्तक लिहिले. त्या पुस्तकाचे नाव आहे "Skill it, Kill it". आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कोणकोणती कौशल्यॆ आवश्यक आहेत असा या पुस्तकाचा विषय आहे. या पुस्तकाचे पहिले प्रकरण "संवाद" अर्थात communication या विषयावर आहे.  प्रकरणाचे नावच "Communication is everything, Everything is communication" असे आहे. केलेले काम किंवा आपल्या भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत योग्य प्रकारे पोहोचवल्या की अनेक गोष्टी सोप्या होतात असा अनुभव आपल्या सगळ्यांनाच रोजच्या जीवनात येतो.  सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य स्थितीचा आणि भारत सरकारने वेळोवेळी प्रसारित केलेल्या माहितीचा या निमित्ताने धांडोळा घ्यावासा वाटतो. अर्थात्, यामध्ये घडलेल्या घटना त्यातून मिळालेला संदेश, सरकारद्वारे लिखित स्वरूपात दिली गेलेली माहिती आणि अनेक पत्रकार परिषदा यांचा समावेश आहे. पहलगाम येथील घटना घडली तेव्हा आपले पंतप्रधान हे सौदी अरेबियाच्या द...

एक व्यक्ती, तीन विधाने आणि तीन परिणाम

जर एखादी व्यक्ती कठीण परिस्थितीत अत्यंत शांत मनाने आणि शांत डोक्याने परिस्थितीला सामोरी जात असेल आणि कठीण परिस्थितीतून मार्ग काढून यशस्वी होत असेल तर, अशी व्यक्ती लोकांच्या नजरेत भरल्याशिवाय राहत नाही. त्यामुळेच मला अशा व्यक्तीबद्दल लिहिण्याचा मोह देखील आवरत नाही. आज मी सर्वांना माहिती असलेल्या कथेतल्या मला जाणवलेल्या काही गोष्टी सांगणार आहे. काही दिवसांपूर्वी नागपूरला एक नागरी सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सत्कारमूर्ती होते नागपूरचेच नेते नितीन गडकरी आणि त्यांचा सत्कार करणारे देखील नागपूरचे दुसरे नेते होते ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. त्या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस असे म्हणाले, की गडकरी साहेब रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत, तर मी अतिशय सांभाळून बोलतो.  आता, श्री देवेंद्र फडणवीस कसे तोलून मापून बोलतात आणि त्याचे अपेक्षित परिणाम भविष्यात कसे दिसतात याची तीन उदाहरणे मी देणार आहे. ही तीनही विधानं एक सामान्य व्यक्ती म्हणून चटकन माझ्या नजरेत भरली आणि म्हणून ती मी आपल्यासमोर ठेवत आहे.  पहिला प्रसंग आहे ते विरोधी पक्षनेता असतानाचा. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक या...