Skip to main content

डॉक्टर हेडगेवार: चरित्र आणि चरित्रकार

एखाद्या महापुरुषाबद्दल लोकांच्या मनात आदर निर्माण करण्यात त्या महापुरुषाच्या चरित्रकाराचा अतिशय मोठा वाटा असतो. विशेषतः जेव्हा त्या व्यक्तीचे निधन होऊन अनेक वर्षं लोटलेली असतात आणि त्या व्यक्तीला पाहिलेली फारच थोडी माणसे हयात असतात. डॉक्टर हेडगेवार यांचे ना. ह. पालकर यांनी लिहिलेले चरित्र पाहिले की याचा प्रत्यय येतो. 

खरंतर, डॉक्टर खूप प्रसिद्धीच्या झोतात असे राहिलेच नाहीत. एकदा ब्रिटिश सरकार विरुद्ध प्रक्षोभक भाषण केल्यामुळे आणि एकदा जंगल सत्याग्रहात भाग घेतल्यामुळे त्यांना तुरुंगवास घडला. विदर्भ - मध्य भारतातले एक स्वातंत्र्य चळवळीतले नेते म्हणून ते सुपरिचित होते मात्र, प्रसिद्धी पासून तसे ते दूरच होते. 

डॉक्टरांच्या व्यक्तिमत्त्वातली खरी मेख ही जगाला दिसू लागली - जेव्हा संघ कार्य हळूहळू वाढू लागलं आणि संघाचे कार्यकर्ते जेव्हा समाजावर काहीतरी परिणाम करु लागले.

त्यामुळेच डॉक्टर हेडगेवार नेमके कसे होते. त्यांचं वागणं, बोलणं, व्यवहार म्हणजेच एक प्रकारे डॉक्टरांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा हा मध्यवर्ती ठेऊन ना. ह. अर्थात् नाना पालकर यांनी डॉक्टरांचे चरित्र लिहिले. 

एखाद्या महापुरुषाच्या आचाराला मध्यवर्ती ठेवून तशी फार कमी चरित्रे लिहिली जातात. त्या व्यक्तीच्या आयुष्यात घडलेल्या घटनांना केंद्रस्थानी ठेऊन चरित्र लिहिले जाते असा सर्वसामान्य अनुभव आहे. पण, डॉक्टरांचा स्वाभिमान, शरीराची - मनाची कणखरता, वागण्या - बोलण्यातले तारतम्य, मित्रांवरचे अकृत्रिम प्रेम, क्रोधावर मिळवलेला विजय, जनसंपर्क करताना असलेली प्रचंड प्रेमाची भावना, दुसऱ्याचं मन सांभाळण्याकरिता सोसलेल्या असंख्य कळा या आणि अशा अनेक गुणांना केंद्रस्थानी ठेऊन हे चरित्र लिहिले आहे.

त्यामुळेच हे चरित्र कुठ्ल्याही व्यक्तीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचते आणि त्यामुळेच वाचकाच्या मनावर दीर्घकालीन परिणाम करते. चरित्र वाचायला घेतले, त्या व्यक्तीच्या आयुष्यातल्या घटना वाचल्या आणि पूर्ण झाल्यावर ठेवून दिले असा अनुभव या चारित्राच्या बाबतीत वाचकांना म्हणूनच येत नाही.

वर उल्लेख केलेल्या सर्व गोष्टींना केंद्रस्थानी ठेऊन हे चरित्र लिहिल्यामुळे डॉक्टर हेडगेवार हे निः संशय पणे वाचकाच्या मनात पक्के स्थान मिळवतात आणि आयुष्यातल्या अनेक प्रसंगांना तोंड देण्याच्या वेळी वाचक अनेक वेळेस या चरित्राचा आधार घेतात. चरित्राचा महिमा म्हणजे अजून काय असू शकते?

नाना पालकर हे स्वतः अत्यंत संवेदनशील, ऋषितुल्य, त्यागी व्यक्तिमत्त्व. चरित्रकार आणि चरित्रनायक यांच्यातला कदाचित हाच समान दुवा चरित्रात उतरल्यामुळे हे चरित्र इतके प्रभावी झाले असावे.

डॉक्टरांचा जेव्हाही आगामी काळात विचार केला जाईल तेव्हा या ग्रंथाचा नेहमीच आधार घेतला जाईल यात काही शंकाच नाही. त्यामुळे, डॉक्टरांच्या आजच्या या स्मृतिदिनी त्यांच्या चरित्रग्रंथाचे आणि चरित्रकाराचे स्मरण करावेसे वाटले म्हणून हा लेखन प्रपंच.

ज्यांची स्मृती आजही सर्व संघ स्वयंसेवकांना "त्वमेव बंधूश्च सखा त्वमेव" या उक्तीप्रमाणे आधार देते त्या श्रद्धेय डॉक्टर हेडगेवारांना हा लेख समर्पित!



Comments

  1. सर्वच ब्लॉग वाचनीय; पू.डॉ. व नानाजी पालकरांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन!!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

नियतीचा क्रूर खेळ आणि रंगलेला कलगीतुरा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवार दि. २८ जानेवारी ला निधन झाले. स्वाभाविकच, राजकीय मतं विसरून लोकांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली. माध्यमांच्या समोर सतत येणाऱ्या सुप्रिया सुळे, रोहित पवार यांना पाहिले असता अशी शंका येत होती की आता पवार कुटुंबातीलच कोणीतरी म्हणजे मुख्यत्वे सुप्रिया सुळे याच दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची धुरा सांभाळतील. सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी पक्षातल्या काही नेत्यांनी अशी विधानं देखील केली की, दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशी अजितदादांची इच्छा होती. या सर्व घटनांना आता एक दोन दिवस उलटून गेलेत आणि आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी बातमी आली.  दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री या विषयाच्या संदर्भात एक प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस हे तोलून मापून बोलणारे आहेत त्यामुळे त्यांचं बोलणं नेहमीच लक्षवेधक असतं. ते म्हणाले, महाराष्ट्र सरकार म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्णपणे पाठीशी उभे राहू. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष" असा स्पष्ट उल्लेख त्यांनी आपल्या बोलण्यात केला. माझी रा...

कधी बहर कधी शिशिर

 डिसेंबर २०२४ मधली घटना आहे. महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपुरातल्या राजभवनाच्या हिरवळीवर पार पडला होता. पण, या नव्या मंत्रिमंडळात गेल्या वीस वर्षांपासून हमखास असलेले एक नाव मात्र नव्हते.  दुसऱ्या दिवशी या मंत्रिमंडळात वगळल्या गेलेल्या नेत्याने पत्रकारांशी बोलताना तीव्र नाराजी, दुःख आणि आपली खदखद व्यक्त केली. "जहाँ नहीं चैना, वहाॅं नहीं रहना" असं हा नेता बोलला.  आतापर्यंत आपल्या लक्षात आलंच असेल हा नेता कोण. कालांतराने म्हणजेच ५-६ महिन्यानंतर भुजबळ पुन्हा एकदा मंत्री झाले. हे सगळं आता आठवण्याचं कारण म्हणजे अजितदादा पवार यांच्या निधनानंतर घडलेल्या घटना आहेत.  अजितदादांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांना तातडीने जे शिष्टमंडळ भेटलं त्यात भुजबळ देखील होते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे या अजित पवारांच्या मर्जीतल्या शिलेदारांसोबत भुजबळ देखील दिसले. विधिमंडळ गटनेत्याची निवड कधी होईल वगैरे पत्रकारांना माहिती देखील भुजबळांनी दिली.  वर्षभरापूर्वी पक्ष सोडण्याची भाषा करणारे भुजबळ अजितदादांच्या मृत्यूनंतर आघाडीच्या नेत्यांपैकी एक दिसत होते. सत्त...

रमेश प्रभू, खिशातले राजीनामे आणि महिला आरक्षण विधेयक

१६ ते १८ एप्रिल दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते, ज्यामध्ये महिला आरक्षण विधेयकाची चर्चा झाली. विधेयक पारित व्हायला दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता होती, जे अर्थातच सरकारकडे नसल्यामुळे विधेयक पारित झाले नाही. या सर्व घटनांचा, पूर्वी घडलेल्या घटनांच्या आधारे धांडोळा घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बंगालच्या निवडणुकांपूर्वी मुद्दाम मोदींनी हे विधेयक संसदेत आणले आणि हाणून पडू दिले जेणेकरून बंगालच्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा त्यांना उचलता येईल असा कयास राजकीय पंडितांकडून वर्तवला जात आहे. एक प्रकारे महिला आरक्षण विधेयकावर मते मिळतात की नाही हे बंगालच्या निवडणुकांमधून भारतीय जनता पक्षाला चाचपून बघायचे आहे असे विश्लेषकांचे मत आहे.  हे घटनाचक्र बघितले असता १९८७ मध्ये झालेल्या विलेपार्ले येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आठवण येते. या निवडणुकीत सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांनी "गर्व से कहो हम हिंदू है" अशी घोषणा दिली होती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मिळतात की नाही हे बाळासाहेबांना चाचपून बघायचे होते आणि त्यासाठीच त्यांनी विलेपार्ले येथील पोटनिवडणुकीवर त्याचा प्रय...