Skip to main content

सफर कर्नाटकची: भाग पाहिला

आता कर्नाटक च्या सुट्टीची गोष्ट सांगतो. मित्र श्रेयस ला म्हटलं खूप दिवसांत कुठे गेलो नाही त्यामुळे जाऊयात. कर्नाटकातल्या हम्पी - बदामी या जागांबद्दल बरच ऐकलं होतं त्यामुळे तिथे जायचं ठरलं.

कर्नाटक बद्दल खूप कुतूहल आधीपासूनच होतं. गाडीनी पुण्याहून सोलापूर मार्गे कर्नाटकच्या दिशेनी निघालो. जाता - जाता वाटेवर सोलापूर - मंगळवेढा - पंढरपूर - उजनीचं धरण या काही जागा दिसतात. साधारण सोलापूर पासून कर्नाटकी पद्धतीत बोलणारी माणसं दिसायला लागतात. कर्नाटकच्या ज्या भागात आम्ही फिरलो ती सगळी गावं तशी फार शांत होती. अर्थात्, मुंबई पुण्यात राहणाऱ्या लोकांना बाकीच्या सगळ्याच जागा तशा शांतच वाटतात. पण, स्वांत - सुखाय असा निवांतपणा या भागात जाणवला. अवती भवती सगळे खनिजांचे साठे त्यामुळे खाणीत दिवसभर काम आणि बाकी आयुष्य आरामात घालवणे हा इथल्या लोकांचा दिनक्रम. 

हवेत देशावरचा कोरडेपणा पण समुद्रावरच्या संस्कृती चा प्रभाव असल्यामुळे सगळीकडे लावलेली नारळाची झाडं. लोकांमध्ये उत्तरेतून कोणी आलंय किंवा परभाषी कोणी आलेत हा भाव अजिबातच नव्हता. त्याउलट आश्चर्यकारकपणे अनेकांना मराठी बोलता येतं हेच लक्षात आलं. 

महाराष्ट्र - पंढरपूरचा पांडुरंग - शिवाजी महाराज - कोल्हापूर - तिथे होणाऱ्या घडामोडी या बद्दल लोकांना बरीच माहिती होती. रस्त्यावर जागोजागी महाराणी चेन्नम्मा चे पुतळे. एक अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे किष्किंधेच्या भल्यामोठ्या पर्वतरांगांच्या भोवताली कुठेच घाट नाहीत. सुटे - सुटे भल्या मोठया दगडांचे पर्वत म्हणजेच वाली - सुग्रिवाची किष्किंधा; आणि त्या किष्किंधेत विजयनगरच्या राजाची राजधानी म्हणजेच पंपा अर्थात् हम्पी. इंग्रजाला पंपा म्हणता आलं नाही म्हणून हम्पी. अवतीभवती शांत - शीतल पण भल्या मोठया पात्राची तुंगभद्रा.

हम्पीत सर्वत्र दगडांची कोरीव कामं आणि अनेक ठिकाणी त्यावर आक्रमकांचे क्रूर घाव. खंडीत मूर्तीला लोकांना पुजता येऊ नये म्हणून केलेले. पण तरीही, ही तेजःपुंज संस्कृती जशीच्या तशी जिवंत आहे. 

लहान - लहान गावं; पण, त्यांच्या आसपास वैभव दडलेलं. कुठे मंदिराच्या भोवतीच्या भल्यामोठ्या दीपमाळा तर कुठे डोंगरात केलेल्या कोरीव कामात भरलेले नैसर्गिक रंग. तत्कालीन सम्राटांनी लोकांचं मन रमावं म्हणून केलेल्या सोयी अजूनही आपलं काम करतायेत.

अशा जागांवर जावून मन खोल-खोल जातं. हे जग कधी निर्माण झालं असेल? ज्या काळात या लेण्या तयार केल्या असतील त्या तयार करणाऱ्यांचा काय हेतू असेल हे आणि असे किती अनेक विचार मनात येऊन जातात. 

ज्ञानेश्वर माउलींच्या अभंगातली " विश्व हा अनादी ठावो| येथ नियंता ईश्वररावो|" ही ओळ हा सगळा भव्य भाग बघताना सतत मनात येत राहते.

(क्रमशः)



Comments

Popular posts from this blog

नियतीचा क्रूर खेळ आणि रंगलेला कलगीतुरा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवार दि. २८ जानेवारी ला निधन झाले. स्वाभाविकच, राजकीय मतं विसरून लोकांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली. माध्यमांच्या समोर सतत येणाऱ्या सुप्रिया सुळे, रोहित पवार यांना पाहिले असता अशी शंका येत होती की आता पवार कुटुंबातीलच कोणीतरी म्हणजे मुख्यत्वे सुप्रिया सुळे याच दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची धुरा सांभाळतील. सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी पक्षातल्या काही नेत्यांनी अशी विधानं देखील केली की, दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशी अजितदादांची इच्छा होती. या सर्व घटनांना आता एक दोन दिवस उलटून गेलेत आणि आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी बातमी आली.  दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री या विषयाच्या संदर्भात एक प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस हे तोलून मापून बोलणारे आहेत त्यामुळे त्यांचं बोलणं नेहमीच लक्षवेधक असतं. ते म्हणाले, महाराष्ट्र सरकार म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्णपणे पाठीशी उभे राहू. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष" असा स्पष्ट उल्लेख त्यांनी आपल्या बोलण्यात केला. माझी रा...

कधी बहर कधी शिशिर

 डिसेंबर २०२४ मधली घटना आहे. महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपुरातल्या राजभवनाच्या हिरवळीवर पार पडला होता. पण, या नव्या मंत्रिमंडळात गेल्या वीस वर्षांपासून हमखास असलेले एक नाव मात्र नव्हते.  दुसऱ्या दिवशी या मंत्रिमंडळात वगळल्या गेलेल्या नेत्याने पत्रकारांशी बोलताना तीव्र नाराजी, दुःख आणि आपली खदखद व्यक्त केली. "जहाँ नहीं चैना, वहाॅं नहीं रहना" असं हा नेता बोलला.  आतापर्यंत आपल्या लक्षात आलंच असेल हा नेता कोण. कालांतराने म्हणजेच ५-६ महिन्यानंतर भुजबळ पुन्हा एकदा मंत्री झाले. हे सगळं आता आठवण्याचं कारण म्हणजे अजितदादा पवार यांच्या निधनानंतर घडलेल्या घटना आहेत.  अजितदादांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांना तातडीने जे शिष्टमंडळ भेटलं त्यात भुजबळ देखील होते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे या अजित पवारांच्या मर्जीतल्या शिलेदारांसोबत भुजबळ देखील दिसले. विधिमंडळ गटनेत्याची निवड कधी होईल वगैरे पत्रकारांना माहिती देखील भुजबळांनी दिली.  वर्षभरापूर्वी पक्ष सोडण्याची भाषा करणारे भुजबळ अजितदादांच्या मृत्यूनंतर आघाडीच्या नेत्यांपैकी एक दिसत होते. सत्त...

रमेश प्रभू, खिशातले राजीनामे आणि महिला आरक्षण विधेयक

१६ ते १८ एप्रिल दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते, ज्यामध्ये महिला आरक्षण विधेयकाची चर्चा झाली. विधेयक पारित व्हायला दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता होती, जे अर्थातच सरकारकडे नसल्यामुळे विधेयक पारित झाले नाही. या सर्व घटनांचा, पूर्वी घडलेल्या घटनांच्या आधारे धांडोळा घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बंगालच्या निवडणुकांपूर्वी मुद्दाम मोदींनी हे विधेयक संसदेत आणले आणि हाणून पडू दिले जेणेकरून बंगालच्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा त्यांना उचलता येईल असा कयास राजकीय पंडितांकडून वर्तवला जात आहे. एक प्रकारे महिला आरक्षण विधेयकावर मते मिळतात की नाही हे बंगालच्या निवडणुकांमधून भारतीय जनता पक्षाला चाचपून बघायचे आहे असे विश्लेषकांचे मत आहे.  हे घटनाचक्र बघितले असता १९८७ मध्ये झालेल्या विलेपार्ले येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आठवण येते. या निवडणुकीत सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांनी "गर्व से कहो हम हिंदू है" अशी घोषणा दिली होती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मिळतात की नाही हे बाळासाहेबांना चाचपून बघायचे होते आणि त्यासाठीच त्यांनी विलेपार्ले येथील पोटनिवडणुकीवर त्याचा प्रय...