Skip to main content

मध्यमवर्गीय माणसाचे डोळे खाडकन् उघडणारी निवडणूक

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले. भारतीय जनता पक्ष बहुमताला ३५ जागांनी कमी पडला. पण, मित्रपक्षांच्या साथीने सरकार बनवू शकला. 

निवडणुकीचे आकडे पाहिले तर, २० जागा अशा आहेत की जिथे भाजपाचा तीन हजार ते तीस हजार या दायऱ्यात पराभव झाला. तर, काही जागा भाजप अगदी थोडक्यात जिंकला. 

मतदानाची टक्केवारी पाहिली तर ६५.७९% टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत हा आकडा साधारण एक ते सव्वा टक्क्यांनी कमी आहे. ६४.२० कोटी लोकांनी मतदान केलं.

आता, जर गेल्या निवडणुकी प्रमाणे यंदाही ६७% मतदान झालं असतं तर ६० लाख अधिक लोकांनी मतदान केलं असतं.

आता या अधिकच्या ६० लाख लोकांत कोण कुठल्या पक्षाचा मतदार आहे हा भाग राजकीय तज्ज्ञ अभ्यास करतील. 

पण, एक बाब जी माझ्या लक्षात आली ती म्हणजे, मध्यमवर्गीय समाज हा मतदानाच्या बाबतीत काही प्रमाणात उदासीन आहे. जर, मतदानाला जाणं शक्य झालं तर ठीक नाहीतर राहू देऊ असा विचार मध्यमवर्गीय करतात. विशेषतः जी मंडळी बाहेरगावी असतात ती किंवा जी मंडळी मतदानाच्या दिवशी गावात नसतात त्या मंडळीत असा विचार दिसतो. 

याचा परिणाम काय होतो हे सांगायला एक उदाहरण देतो. धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराचा अवघ्या तीन हजार मतांनी पराभव झाला. आता पुढे अजून एक धक्कादायक गोष्ट सांगतो. धुळे लोकसभेत मालेगाव हा भाग सोडला तर अन्य सर्व भागात भाजपाच्या उमेदवारानी चांगली आघाडी घेतली होती पण, मालेगाव भागात मतदान झालं नाही त्यामुळे उमेदवार पडला. 

आता, न लिहिता सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी स्पष्ट होतील. 

लग्न, अन्य कार्यक्रम, नोकरी, नातवंडं लहान असल्यामुळे बाहेरगावी असणारे असे अनेक लोक आहेत की जे मतदान करु शकत नाहीत. मतदानाच्या दिवशी माझ्या स्वतःच्या परिचयातले २२ लोक असे होते की जे मतदानाला हजर नव्हते. 

हीच परिस्थिती धुळ्यात, बीड मध्ये होणं अगदीच शक्य आहे. 

आता, विधानसभेच्या निवडणुका येत आहेत. अठरा वर्षे पूर्ण करून एकोणीसाव्या वर्षात पदार्पण केलेली अनेक मंडळी असतील. त्यांनी लवकरात लवकर आपली नावे निवडणूक आयोगाच्या संकेस्थळावर जाऊन नोंदवून घ्यावीत. तसेच आपल्या फिरण्याचे, प्रवासाचे चार महिन्यांनंतरचे नियोजन करताना निवडणुकीच्या तारखा बघून त्याप्रमाणे करावे. 

वर उल्लेख केलेल्या २० जागांवर जर अधिक मतदान झाले असते तर मोदींचे सरकार अधिक बळकट असलेले आपल्याला पाहायला मिळाले असते. 

आपल्याला जर देशासाठी अहोरात्र काम करणारा नेता हवा असेल तर त्याचे हात बळकट करणं आपल्या हातात आहे. मी मोदींचं केवळ गुणगान करीन आणि ते सर्व सांभाळून घेतील असं केलं तर काहीच होणार नाही. 

जरा विचार करा की विधानसभेत ज्या लोकांमुळे मेट्रो, चांगले महामार्ग, उड्डाणपूल तयार होतायेत ती मंडळी आलीत तर या प्रकल्पांचे काय होईल आणि आपले जीवनमान जे लवकरच अजून चांगले होईल अशी आशा असलेल्या मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्याचे काय होईल. मला वाटतं हा विचारच आपल्याला नजीकच्या काळात येणाऱ्या निवडणुकीत चुका टाळायला मदत करेल.

✍️ देवाशीष विनोद सहस्रबुद्धे 

Comments

Popular posts from this blog

नियतीचा क्रूर खेळ आणि रंगलेला कलगीतुरा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवार दि. २८ जानेवारी ला निधन झाले. स्वाभाविकच, राजकीय मतं विसरून लोकांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली. माध्यमांच्या समोर सतत येणाऱ्या सुप्रिया सुळे, रोहित पवार यांना पाहिले असता अशी शंका येत होती की आता पवार कुटुंबातीलच कोणीतरी म्हणजे मुख्यत्वे सुप्रिया सुळे याच दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची धुरा सांभाळतील. सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी पक्षातल्या काही नेत्यांनी अशी विधानं देखील केली की, दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशी अजितदादांची इच्छा होती. या सर्व घटनांना आता एक दोन दिवस उलटून गेलेत आणि आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी बातमी आली.  दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री या विषयाच्या संदर्भात एक प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस हे तोलून मापून बोलणारे आहेत त्यामुळे त्यांचं बोलणं नेहमीच लक्षवेधक असतं. ते म्हणाले, महाराष्ट्र सरकार म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्णपणे पाठीशी उभे राहू. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष" असा स्पष्ट उल्लेख त्यांनी आपल्या बोलण्यात केला. माझी रा...

कधी बहर कधी शिशिर

 डिसेंबर २०२४ मधली घटना आहे. महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपुरातल्या राजभवनाच्या हिरवळीवर पार पडला होता. पण, या नव्या मंत्रिमंडळात गेल्या वीस वर्षांपासून हमखास असलेले एक नाव मात्र नव्हते.  दुसऱ्या दिवशी या मंत्रिमंडळात वगळल्या गेलेल्या नेत्याने पत्रकारांशी बोलताना तीव्र नाराजी, दुःख आणि आपली खदखद व्यक्त केली. "जहाँ नहीं चैना, वहाॅं नहीं रहना" असं हा नेता बोलला.  आतापर्यंत आपल्या लक्षात आलंच असेल हा नेता कोण. कालांतराने म्हणजेच ५-६ महिन्यानंतर भुजबळ पुन्हा एकदा मंत्री झाले. हे सगळं आता आठवण्याचं कारण म्हणजे अजितदादा पवार यांच्या निधनानंतर घडलेल्या घटना आहेत.  अजितदादांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांना तातडीने जे शिष्टमंडळ भेटलं त्यात भुजबळ देखील होते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे या अजित पवारांच्या मर्जीतल्या शिलेदारांसोबत भुजबळ देखील दिसले. विधिमंडळ गटनेत्याची निवड कधी होईल वगैरे पत्रकारांना माहिती देखील भुजबळांनी दिली.  वर्षभरापूर्वी पक्ष सोडण्याची भाषा करणारे भुजबळ अजितदादांच्या मृत्यूनंतर आघाडीच्या नेत्यांपैकी एक दिसत होते. सत्त...

रमेश प्रभू, खिशातले राजीनामे आणि महिला आरक्षण विधेयक

१६ ते १८ एप्रिल दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते, ज्यामध्ये महिला आरक्षण विधेयकाची चर्चा झाली. विधेयक पारित व्हायला दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता होती, जे अर्थातच सरकारकडे नसल्यामुळे विधेयक पारित झाले नाही. या सर्व घटनांचा, पूर्वी घडलेल्या घटनांच्या आधारे धांडोळा घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बंगालच्या निवडणुकांपूर्वी मुद्दाम मोदींनी हे विधेयक संसदेत आणले आणि हाणून पडू दिले जेणेकरून बंगालच्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा त्यांना उचलता येईल असा कयास राजकीय पंडितांकडून वर्तवला जात आहे. एक प्रकारे महिला आरक्षण विधेयकावर मते मिळतात की नाही हे बंगालच्या निवडणुकांमधून भारतीय जनता पक्षाला चाचपून बघायचे आहे असे विश्लेषकांचे मत आहे.  हे घटनाचक्र बघितले असता १९८७ मध्ये झालेल्या विलेपार्ले येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आठवण येते. या निवडणुकीत सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांनी "गर्व से कहो हम हिंदू है" अशी घोषणा दिली होती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मिळतात की नाही हे बाळासाहेबांना चाचपून बघायचे होते आणि त्यासाठीच त्यांनी विलेपार्ले येथील पोटनिवडणुकीवर त्याचा प्रय...