Skip to main content

पं. हृदयनाथ मंगेशकर

काल पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांचा वाढदिवस झाला. त्या निमित्त मला त्यांच्या विषयी जे वाटतं ते इथे लिहितो आहे.

यशवंत देव, बाबुजी, श्रीनिवास खळे, पं. हृदयनाथ मंगेशकर ही मागच्या पिढीतली संगीतकार मंडळी. 

प्रत्येकाची वैशिष्ट्य वेगळी. प्रत्येकाची रंग भरण्याची पद्धत वेगळी. प्रत्येकाचा मंच वेगळा. कोणी रेडिओवर संगीत केले, कोणी चित्रपटात तर कोणी कॅसेट्स साठी. 

पण, पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी आपला "maverickness" मात्र अप्रतिम पणे दाखवला. काव्याची अत्यंत उत्तम, गहन समज आणि त्यातून निर्माण होणारं त्यांचं संगीत. 

अत्यंत लहान वयात भा. रा. तांबे यांच्या कवितांचा त्यांना व्यासंग निर्माण झाला आणि मग त्यांच्या कवितांना चाली लावायला सुरुवात झाली.

महाराष्ट्राला अनेक नवीन कवींची ओळख जर कोणी करून दिली असेल तर ती हृदयनाथांनी. 

भा. रा. तांबे, राजा बढे, सुरेश भट, ग्रेस, ना. धो. महानोर ही आणि किती अनेक. शिवाय संत साहित्याचा त्यांचा अभ्यास आणि त्यातून ज्ञानोबा-तुकोबांच्या अभंगांना चाली. हा प्रवासच जबरदस्त आहे. 

रात्रभर चालणाऱ्या त्यांच्या मैफिली आणि त्यात एका - एका काव्यावरचं त्यांचं विवेचन यामुळे तर त्यांनी बहार आणली. 

सुरेश भट किंवा ग्रेस यांच्या सारखे उत्तम कवी पण आहेत केवळ नेहमीचेच कवी चांगल्या कविता करतात असं नाही हे त्यांनी ठसवून आपल्या संगीतातून सांगितलं.

पंडितजी प्रखर देशभक्त, हिंदुत्ववादी आणि सावरकरभक्त सुद्धा. त्यामुळे तात्याराव सावरकरांच्या रचना महाराष्ट्रभर खणखणीतपणे घुमल्या त्या ह्रदयनाथांमुळेच.

नंतरच्या काळात उत्तरा केळकर, पद्मजा फेणाणी, सुरेश वाडकर यांच्यासारख्या आपल्या नंतरच्या पिढीतल्या गायकांकडून सुद्धा त्यांनी भरपूर उत्तम काम करवून घेतले.

खरंतर त्यांचा आवाज पण फार सुंदर, वेगळाच, उमदा पण, त्यांनी भरपूर पार्श्वगायन का केलं नाही हा प्रश्नच आहे. महाराष्ट्राला त्यांच्यातला पार्श्वगायक अधिक प्रमाणात पाहायला आवडलं असतं. 

अशा काव्याच्या जाणत्या, आपले वेगळेपण अत्यंत जातिवंतपणे जपणाऱ्या, आपल्या संगीतानी भावसंगीताचे जग घुसळून काढणाऱ्या भावगंधर्व पं. हृदयनाथ मंगेशकर यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 

तुमचं संगीत पुढच्या अनेक पिढ्यांना आनंद देत राहो.


✍🏼 देवाशीष विनोद सहस्रबुद्धे



Comments

Popular posts from this blog

नियतीचा क्रूर खेळ आणि रंगलेला कलगीतुरा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवार दि. २८ जानेवारी ला निधन झाले. स्वाभाविकच, राजकीय मतं विसरून लोकांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली. माध्यमांच्या समोर सतत येणाऱ्या सुप्रिया सुळे, रोहित पवार यांना पाहिले असता अशी शंका येत होती की आता पवार कुटुंबातीलच कोणीतरी म्हणजे मुख्यत्वे सुप्रिया सुळे याच दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची धुरा सांभाळतील. सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी पक्षातल्या काही नेत्यांनी अशी विधानं देखील केली की, दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशी अजितदादांची इच्छा होती. या सर्व घटनांना आता एक दोन दिवस उलटून गेलेत आणि आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी बातमी आली.  दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री या विषयाच्या संदर्भात एक प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस हे तोलून मापून बोलणारे आहेत त्यामुळे त्यांचं बोलणं नेहमीच लक्षवेधक असतं. ते म्हणाले, महाराष्ट्र सरकार म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्णपणे पाठीशी उभे राहू. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष" असा स्पष्ट उल्लेख त्यांनी आपल्या बोलण्यात केला. माझी रा...

कधी बहर कधी शिशिर

 डिसेंबर २०२४ मधली घटना आहे. महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपुरातल्या राजभवनाच्या हिरवळीवर पार पडला होता. पण, या नव्या मंत्रिमंडळात गेल्या वीस वर्षांपासून हमखास असलेले एक नाव मात्र नव्हते.  दुसऱ्या दिवशी या मंत्रिमंडळात वगळल्या गेलेल्या नेत्याने पत्रकारांशी बोलताना तीव्र नाराजी, दुःख आणि आपली खदखद व्यक्त केली. "जहाँ नहीं चैना, वहाॅं नहीं रहना" असं हा नेता बोलला.  आतापर्यंत आपल्या लक्षात आलंच असेल हा नेता कोण. कालांतराने म्हणजेच ५-६ महिन्यानंतर भुजबळ पुन्हा एकदा मंत्री झाले. हे सगळं आता आठवण्याचं कारण म्हणजे अजितदादा पवार यांच्या निधनानंतर घडलेल्या घटना आहेत.  अजितदादांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांना तातडीने जे शिष्टमंडळ भेटलं त्यात भुजबळ देखील होते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे या अजित पवारांच्या मर्जीतल्या शिलेदारांसोबत भुजबळ देखील दिसले. विधिमंडळ गटनेत्याची निवड कधी होईल वगैरे पत्रकारांना माहिती देखील भुजबळांनी दिली.  वर्षभरापूर्वी पक्ष सोडण्याची भाषा करणारे भुजबळ अजितदादांच्या मृत्यूनंतर आघाडीच्या नेत्यांपैकी एक दिसत होते. सत्त...

रमेश प्रभू, खिशातले राजीनामे आणि महिला आरक्षण विधेयक

१६ ते १८ एप्रिल दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते, ज्यामध्ये महिला आरक्षण विधेयकाची चर्चा झाली. विधेयक पारित व्हायला दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता होती, जे अर्थातच सरकारकडे नसल्यामुळे विधेयक पारित झाले नाही. या सर्व घटनांचा, पूर्वी घडलेल्या घटनांच्या आधारे धांडोळा घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बंगालच्या निवडणुकांपूर्वी मुद्दाम मोदींनी हे विधेयक संसदेत आणले आणि हाणून पडू दिले जेणेकरून बंगालच्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा त्यांना उचलता येईल असा कयास राजकीय पंडितांकडून वर्तवला जात आहे. एक प्रकारे महिला आरक्षण विधेयकावर मते मिळतात की नाही हे बंगालच्या निवडणुकांमधून भारतीय जनता पक्षाला चाचपून बघायचे आहे असे विश्लेषकांचे मत आहे.  हे घटनाचक्र बघितले असता १९८७ मध्ये झालेल्या विलेपार्ले येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आठवण येते. या निवडणुकीत सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांनी "गर्व से कहो हम हिंदू है" अशी घोषणा दिली होती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मिळतात की नाही हे बाळासाहेबांना चाचपून बघायचे होते आणि त्यासाठीच त्यांनी विलेपार्ले येथील पोटनिवडणुकीवर त्याचा प्रय...