Skip to main content

पुस्तक परिचय २ : एक होता कार्व्हर

"एक होता कार्व्हर" हे शीर्षकच इतके बोलके आहे की त्यावरून आपल्याला स्पष्ट कळतं की लेखिकेला कथा सांगण्यात रुची आहे.

देशकाल स्थल परिस्थिती भिन्न असलेल्या एखाद्या महापुरुषाचं चरित्र लिहिणे हे एक कठीण काम असते. त्यातही जर ते चरित्र कुठल्याही वयातल्या व्यक्तीनी वाचावं आणि त्यातून बोध घ्यावा अशा पद्धतीनी लिहायचं असेल तर मग हे काम अजूनच कठीण होते. "एक होता कार्व्हर" च्या बाबतीत हे अतिशय कठीण काम लेखिका वीणा गवाणकर यांनी अतिशय यशस्वीपणे केलेले आहे. 

"एक होता कार्व्हर" हे थोर अमेरिकन कृषीतज्ज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचे कादंबरीवजा लघुचरित्र आहे. कथा सहजपणे फुलवत फुलवत लेखिका जाते आणि आपण एका सुंदर कलाकृतीच्या आस्वादाबरोबरच एका अज्ञात पण अतिशय अभ्यासू आणि सृजनशील व्यक्तीच्या आयुष्याची सुंदर सफर करत आहोत असे वाचकाला वाटत राहते. त्यामुळे पुस्तक पूर्ण केल्याशिवाय हातातून सोडवत नाही . १९ व्या शतकातील अमेरीका, तिथली गुलामगिरीची प्रथा आणि निग्रोंना होणारे त्रास, त्यांच्या भयानक समस्या यांची देखील वाचकाला कल्पना येते. 

 लेखिका आत्या, बाई, बाबा या भारतीय नात्यांची उपमा चरित्रनायकाच्या आयुष्यातल्या व्यक्तींसाठी वापरते. त्यामुळे लेखन शैली बाळबोध होऊन त्याची परिणती पुस्तकाच्या लोकप्रियतेत झाली आहे. आजमितीपर्यंत या पुस्तकाच्या ४५ आवृत्त्या निघाव्या यावरून या पुस्तकाची लोकप्रियता आणि लेखनशैलीची उत्कृष्टता अधोरेखित होते.    

ज्यांना मराठी वाचनाची सवय लावायची आहे त्यांना भेट देण्यासाठी अतिशय योग्य असे हे पुस्तक आहे.

सर्व लहानांनी आणि लहानपण जपावंसं वाटणाऱ्या सर्व मोठ्यांनी, रचनात्मक दृष्टी बाळगणाऱ्या सर्वांनी, निर्मितीचा आनंद ज्यांना मिळतो अशांनी, क्षमा - निस्वार्थी भाव शिकण्याची इच्छा असलेल्या आणि त्यातून प्रेरणा घेण्याची इच्छा असलेल्या सर्वांनी नक्की वाचावे असे हे पुस्तक.

लेखिका: वीणा गवाणकर

प्रकाशक: राजहंस प्रकाशन

पृष्ठसंख्या: १८२       



Comments

  1. मस्त विश्लेषण

    ReplyDelete
  2. खूप छान पुस्तक अभिप्राय.

    ReplyDelete
  3. Ek uttam pustak, an ek apratim Parichay 🙌🏼

    ReplyDelete
  4. छान परिक्षण लिहिलं आहेस.. ग्रेट..शुभेच्छा

    ReplyDelete
  5. देवाषिस, खूपच त्रोटक लिहितो आहेस. पुस्तकाबद्दल जिज्ञासा वाढावी यासाठी त्यातील काही कोटेशन्स टाकली तर पूरक ठरतं. जसे, कार्व्हरच्या जीवनाला कलाटणी देणारे दोन-तीन प्रसंग या पुस्तकात आहेत. त्यातला एखादा प्रसंग उद्घृत केला असता तर अधिक मजा आली असती. असो, वाचन संस्कृती जोपासण्यासाठी हे ही नसे थोडके. 👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

नियतीचा क्रूर खेळ आणि रंगलेला कलगीतुरा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवार दि. २८ जानेवारी ला निधन झाले. स्वाभाविकच, राजकीय मतं विसरून लोकांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली. माध्यमांच्या समोर सतत येणाऱ्या सुप्रिया सुळे, रोहित पवार यांना पाहिले असता अशी शंका येत होती की आता पवार कुटुंबातीलच कोणीतरी म्हणजे मुख्यत्वे सुप्रिया सुळे याच दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची धुरा सांभाळतील. सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी पक्षातल्या काही नेत्यांनी अशी विधानं देखील केली की, दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशी अजितदादांची इच्छा होती. या सर्व घटनांना आता एक दोन दिवस उलटून गेलेत आणि आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी बातमी आली.  दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री या विषयाच्या संदर्भात एक प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस हे तोलून मापून बोलणारे आहेत त्यामुळे त्यांचं बोलणं नेहमीच लक्षवेधक असतं. ते म्हणाले, महाराष्ट्र सरकार म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्णपणे पाठीशी उभे राहू. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष" असा स्पष्ट उल्लेख त्यांनी आपल्या बोलण्यात केला. माझी रा...

कधी बहर कधी शिशिर

 डिसेंबर २०२४ मधली घटना आहे. महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपुरातल्या राजभवनाच्या हिरवळीवर पार पडला होता. पण, या नव्या मंत्रिमंडळात गेल्या वीस वर्षांपासून हमखास असलेले एक नाव मात्र नव्हते.  दुसऱ्या दिवशी या मंत्रिमंडळात वगळल्या गेलेल्या नेत्याने पत्रकारांशी बोलताना तीव्र नाराजी, दुःख आणि आपली खदखद व्यक्त केली. "जहाँ नहीं चैना, वहाॅं नहीं रहना" असं हा नेता बोलला.  आतापर्यंत आपल्या लक्षात आलंच असेल हा नेता कोण. कालांतराने म्हणजेच ५-६ महिन्यानंतर भुजबळ पुन्हा एकदा मंत्री झाले. हे सगळं आता आठवण्याचं कारण म्हणजे अजितदादा पवार यांच्या निधनानंतर घडलेल्या घटना आहेत.  अजितदादांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांना तातडीने जे शिष्टमंडळ भेटलं त्यात भुजबळ देखील होते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे या अजित पवारांच्या मर्जीतल्या शिलेदारांसोबत भुजबळ देखील दिसले. विधिमंडळ गटनेत्याची निवड कधी होईल वगैरे पत्रकारांना माहिती देखील भुजबळांनी दिली.  वर्षभरापूर्वी पक्ष सोडण्याची भाषा करणारे भुजबळ अजितदादांच्या मृत्यूनंतर आघाडीच्या नेत्यांपैकी एक दिसत होते. सत्त...

रमेश प्रभू, खिशातले राजीनामे आणि महिला आरक्षण विधेयक

१६ ते १८ एप्रिल दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते, ज्यामध्ये महिला आरक्षण विधेयकाची चर्चा झाली. विधेयक पारित व्हायला दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता होती, जे अर्थातच सरकारकडे नसल्यामुळे विधेयक पारित झाले नाही. या सर्व घटनांचा, पूर्वी घडलेल्या घटनांच्या आधारे धांडोळा घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बंगालच्या निवडणुकांपूर्वी मुद्दाम मोदींनी हे विधेयक संसदेत आणले आणि हाणून पडू दिले जेणेकरून बंगालच्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा त्यांना उचलता येईल असा कयास राजकीय पंडितांकडून वर्तवला जात आहे. एक प्रकारे महिला आरक्षण विधेयकावर मते मिळतात की नाही हे बंगालच्या निवडणुकांमधून भारतीय जनता पक्षाला चाचपून बघायचे आहे असे विश्लेषकांचे मत आहे.  हे घटनाचक्र बघितले असता १९८७ मध्ये झालेल्या विलेपार्ले येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आठवण येते. या निवडणुकीत सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांनी "गर्व से कहो हम हिंदू है" अशी घोषणा दिली होती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मिळतात की नाही हे बाळासाहेबांना चाचपून बघायचे होते आणि त्यासाठीच त्यांनी विलेपार्ले येथील पोटनिवडणुकीवर त्याचा प्रय...