दि. ३० जुलै ते ३ ऑगस्ट २०१६ दरम्यान झालेल्या डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती आंतरराष्ट्रीय संगीत समारोहाचा अनुभव सांगतो. वर्तमानपत्रात समारोहाची जाहिरात वाचली; तेव्हा कळलं की समारोहात पं. हरिप्रसाद चौरसिया, उस्ताद अमजद अली खान, शिवमणी, प्रवीण घोडखिंडी, रशीद खान, पं. व्यंकटेश कुमार, राहुल देशपांडे हे सर्व दिग्गज आपली कला सादर करणार आहेत. एवढे दिग्गज (नागपुरी भाषेत "तोफचंद") एकाच महोत्सवात येत असल्यावर कोणी रसिक अशी संधी सोडेल?. अर्थातच नाही.
सभागृहाच्या प्रवेशद्वारावर सुंदर दीपमाळ, व्हरांड्यात भीमसेनजी आणि मास्टर दीनानाथांच्या सुंदर रांगोळ्या, फुलांनी शृंगारलेला रंगमंच, त्या फुलांचा संपूर्ण सभागृहभर दरवळत असलेला सुगंध, त्याच्या जोडीला या सर्व दिग्गजांनी आळवलेला एक एक स्वर आणि त्याच्यावर आपले प्राण कानाशी एकवटून एक एक स्वर साठवणाऱ्या रसिक प्रेक्षकांनी म्हटलेले वाह!!!!
हे सारे आजही आठवले तरी मला स्वर्गीय सुखाचा आनंद मिळतो;असं वाटतं की त्याच्यातच तरंगत राहावं.
ताकाहीरो अराई नावाच्या एका संतूर वादकानी तर इतकी सुंदर संतूर वाजवली की त्याचं संतूरवादन संपल्याच्या दोन तासानंतरही मी संतूरच ऐकतो आहे असं मला वाटत होतं. ओजस अधियाने शिवमणी बरोबर वाजवलेला तबला कसा होता हे तर फक्त अनुभवल्याच जाऊ शकते; त्याचं शब्दात वर्णन करण्याचं माझं सामर्थ्य नाही.
हरिप्रसाद चौरासियांचं बासरीवादन ऐकायला मिळालं; अक्षरशः भरून पावलो. उस्ताद अमजद अली खान सरोद वाजवतात आहेत म्हटल्यावर लोक वेळ काळाची पर्वा न करता रात्री १२.३० वाजेपर्यंत तल्लीन होऊन कार्यक्रम ऐकत होते.
हरिप्रसाद चौरासियांचं बासरीवादन ऐकायला मिळालं; अक्षरशः भरून पावलो. उस्ताद अमजद अली खान सरोद वाजवतात आहेत म्हटल्यावर लोक वेळ काळाची पर्वा न करता रात्री १२.३० वाजेपर्यंत तल्लीन होऊन कार्यक्रम ऐकत होते.
अजून लिहिण्यासारखं खूप आहे; पण लिहीत बसलो तर कदाचित फेसबुक नी पोस्ट लिहायला दिलेली जागा कमी पडेल आणि कितीही लिहिलं तरी त्या तपस्वी गंधर्वांनी घेतलेल्या मेहनतीचे वर्णन करण्यात माझी लेखणी थिटी पडेल.
अजून काय लिहू? असं म्हणतात कि अनुभूती ला अनुभूतीनीच समजावं लागतं.
✍️देवाशीष विनोद सहस्रबुद्धे
✍️देवाशीष विनोद सहस्रबुद्धे
Comments
Post a Comment