Skip to main content

पुण्यस्मरण बाळासाहेब देवरसांचे

आज दिनांक १७ जून. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक मा. बाळासाहेब देवरस यांची पुण्यतिथी.
संघ स्वयंसेवक म्हणून बाळासाहेब सर्वच कार्यकर्त्यांसाठी एक अभ्यासाचा विषय होऊ शकतात.
बाळासाहेबांचं १९६३ पर्यंतचं कार्यक्षेत्र हे नागपूरच. वास्तविक ते १९३९ पासून प्रचारक, परंतु बंगालमध्ये काही महिन्यांचा प्रचारकाळ सोडला तर सहसरकार्यवाह होई पर्यंत त्यांची पूर्ण ह्यात ही नागपुरातच गेली. बाळासाहेबांना गुरुजी डॉक्टर हेडगेवारांची प्रतिकृती आहेत असं म्हणत. ही केवळ गुरुजींची उक्ती नव्हती; बाळासाहेबांची अनेक भाषणं आणि त्यांचं आयुष्य आपण नीट बघितलं तर, डॉक्टरांच्या अनेक भुमिकांशी आपल्याला साधर्म्य सापडेल. १९४६ सालच्या नागपुरातल्या बौद्धिक वर्गात बाळासाहेबांनी स्पष्टपणे म्हटले, की आम्हाला केवळ दक्ष आरम करत बसायचं नाही, तर समाजजीवनातल्या सर्व क्षेत्रात लवकरात लवकर सुयोग्य कार्यकर्ते पाठवायचे आहेत. अन्य क्षेत्रात जो कार्यकर्ता काम करायला चालला आहे त्यानी कसं काम करावं या बाबतीत बाळासाहेबांनी केलेलं मार्गदर्शन अतिशय अमोल आहे. कुठल्याही क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यानी संघर्षानी नव्हे तर समन्वयानी प्रश्न सोडवावेत ही अत्यंत महत्वपूर्ण सूचना ते नेहमी करीत असत. भारतीय जनसंघाच्या स्थापनेनंतर राजकीय क्षेत्रात देखील कार्यकर्ते पाठवले पाहिजेत ही अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बाळासाहेबांचीच. पत्रकारितेच्या क्षेत्रात संघ स्वयंसेवकांनी चालवलेली संस्था उभी राहावी यासाठी स्वतः बाळासाहेबांनी सायकलवर गावोगाव हिंडून श्री नरकेसरी प्रकाशन साठी शेअर होल्डींग गोळा केलं. सुरुवातीच्या काळात नागपुरातून अनेक कार्यकर्ते प्रचारक गेले; त्या प्रचारक गेलेल्या कार्यकर्त्याच्या घरच्यांची काळजी बाळासाहेब नेहमीच वाहत.
संघामध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्यामुळे प्रश्नकर्त्या कार्यकर्त्याच्या मनात नेमके काय आहे हे ते बरोब्बर ओळखून उत्तर देत असत. भाषण सरळ आणि स्पष्ट असे; अलंकारिक भाषेचा मुळीच वापर करीत नसत. भाषणामध्ये संस्कृत सुभाषिते quote करत असत.
१९७४ सालचं त्यांचं "सामाजिक समता आणि हिंदू संघटन" या विषयावरचं भाषण हे एखाद्या विषयावरचा balanced approach म्हणजे काय याचा आदर्श आहेत. १९८१ सालच्या प्रतिनिधी सभेत त्यांनी आरक्षण या विषयावर प्रतिनिधींना मार्गदर्शन करताना "तुमच्यावर अन्याय झाला असता तर तुम्ही जसा विचार केला असता, त्या दृष्टीनी विचार करा" अशी अत्यंत व्यवहारी सूचना केली.

संघ आणि संघविचारांच्या संघटना (संघपरिवार) यांच्यातली परस्परपूरकता ते नेहमी विषद करत असत.

बाळासाहेब ११ व्या वर्षी संघात आले आणि संघरुप होऊन गेले, संघाच्या पहिल्या गुरुदक्षिणा उत्सवापासून संघाचा स्वयंसेवक देशाचा पंतप्रधान होईपर्यंतच्या संघाच्या प्रवासाचे ते साक्षी होते. मोहिते शाखेतला गटनायक ते सरसंघचालक असा संपूर्ण प्रवास त्यांनी आयुष्यात केला. त्यामुळे बाळासाहेब देवरस यांचा इतिहास म्हणजे संघाचा पहिल्या सत्तर वर्षांचा इतिहास असं म्हंटल्या जातं. संघात येऊन संपूर्ण संघरुप झालेल्या कर्मयोगी बाळासाहेबांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र श्रद्धांजली.

✍️देवाशीष विनोद सहस्रबुद्धे


Comments

Popular posts from this blog

नियतीचा क्रूर खेळ आणि रंगलेला कलगीतुरा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवार दि. २८ जानेवारी ला निधन झाले. स्वाभाविकच, राजकीय मतं विसरून लोकांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली. माध्यमांच्या समोर सतत येणाऱ्या सुप्रिया सुळे, रोहित पवार यांना पाहिले असता अशी शंका येत होती की आता पवार कुटुंबातीलच कोणीतरी म्हणजे मुख्यत्वे सुप्रिया सुळे याच दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची धुरा सांभाळतील. सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी पक्षातल्या काही नेत्यांनी अशी विधानं देखील केली की, दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशी अजितदादांची इच्छा होती. या सर्व घटनांना आता एक दोन दिवस उलटून गेलेत आणि आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी बातमी आली.  दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री या विषयाच्या संदर्भात एक प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस हे तोलून मापून बोलणारे आहेत त्यामुळे त्यांचं बोलणं नेहमीच लक्षवेधक असतं. ते म्हणाले, महाराष्ट्र सरकार म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्णपणे पाठीशी उभे राहू. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष" असा स्पष्ट उल्लेख त्यांनी आपल्या बोलण्यात केला. माझी रा...

कधी बहर कधी शिशिर

 डिसेंबर २०२४ मधली घटना आहे. महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपुरातल्या राजभवनाच्या हिरवळीवर पार पडला होता. पण, या नव्या मंत्रिमंडळात गेल्या वीस वर्षांपासून हमखास असलेले एक नाव मात्र नव्हते.  दुसऱ्या दिवशी या मंत्रिमंडळात वगळल्या गेलेल्या नेत्याने पत्रकारांशी बोलताना तीव्र नाराजी, दुःख आणि आपली खदखद व्यक्त केली. "जहाँ नहीं चैना, वहाॅं नहीं रहना" असं हा नेता बोलला.  आतापर्यंत आपल्या लक्षात आलंच असेल हा नेता कोण. कालांतराने म्हणजेच ५-६ महिन्यानंतर भुजबळ पुन्हा एकदा मंत्री झाले. हे सगळं आता आठवण्याचं कारण म्हणजे अजितदादा पवार यांच्या निधनानंतर घडलेल्या घटना आहेत.  अजितदादांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांना तातडीने जे शिष्टमंडळ भेटलं त्यात भुजबळ देखील होते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे या अजित पवारांच्या मर्जीतल्या शिलेदारांसोबत भुजबळ देखील दिसले. विधिमंडळ गटनेत्याची निवड कधी होईल वगैरे पत्रकारांना माहिती देखील भुजबळांनी दिली.  वर्षभरापूर्वी पक्ष सोडण्याची भाषा करणारे भुजबळ अजितदादांच्या मृत्यूनंतर आघाडीच्या नेत्यांपैकी एक दिसत होते. सत्त...

रमेश प्रभू, खिशातले राजीनामे आणि महिला आरक्षण विधेयक

१६ ते १८ एप्रिल दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते, ज्यामध्ये महिला आरक्षण विधेयकाची चर्चा झाली. विधेयक पारित व्हायला दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता होती, जे अर्थातच सरकारकडे नसल्यामुळे विधेयक पारित झाले नाही. या सर्व घटनांचा, पूर्वी घडलेल्या घटनांच्या आधारे धांडोळा घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बंगालच्या निवडणुकांपूर्वी मुद्दाम मोदींनी हे विधेयक संसदेत आणले आणि हाणून पडू दिले जेणेकरून बंगालच्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा त्यांना उचलता येईल असा कयास राजकीय पंडितांकडून वर्तवला जात आहे. एक प्रकारे महिला आरक्षण विधेयकावर मते मिळतात की नाही हे बंगालच्या निवडणुकांमधून भारतीय जनता पक्षाला चाचपून बघायचे आहे असे विश्लेषकांचे मत आहे.  हे घटनाचक्र बघितले असता १९८७ मध्ये झालेल्या विलेपार्ले येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आठवण येते. या निवडणुकीत सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांनी "गर्व से कहो हम हिंदू है" अशी घोषणा दिली होती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मिळतात की नाही हे बाळासाहेबांना चाचपून बघायचे होते आणि त्यासाठीच त्यांनी विलेपार्ले येथील पोटनिवडणुकीवर त्याचा प्रय...