Skip to main content

शिवछत्रपती आणि 'ती' मंतरलेली सात वर्षे

आपल्याला सर्वांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य अतिशय नाट्यपूर्ण आहे. अफझलखानाचा शिताफीनी केलेला वध, त्यानंतर लगेचच झेललेलं सिद्धी जौहरचं आक्रमण, आणि पन्हाळगडाकडून विशाळगडाकडे कूच, चालून आलेला शास्ताखान आणि लाल महालात घुसून त्याची तोडलेली बोटे आणि त्यानंतर आग्रा भेट आणि तेथून मिठाईच्या पेटाऱ्यातून केलेलं पलायन, या त्या नाट्यपूर्ण घटना होत. या सर्व घटना केवळ सात वर्षांच्या कालावधीतल्या आहेत (१६५९ ते १६६६). पण या घटना महाराजांच्या आयुष्याची ओळख मानल्या जातात.
या सर्व घटना आपल्याला माहिती आहेत, पण आपण या घटनांकडे मानसिकदृष्ट्या(psychologically) पाहिलं पाहिजे. ही सगळी संकटं भयंकर म्हणजे भयंकरच मोठी होती. संकटांचा डोंगर म्हणजे काय तर या सर्व घटना. तरीदेखील शिवाजी महाराजांनी या संकटांचा केलेला सामना अक्षरशः अद्वितीय आहे. आपले प्राण घ्यायला तो धिप्पाड ७ फूट उंच, क्रूर अफझलखान येतो आहे ही कल्पनाच गर्भगळीत करून टाकणारी आहे. तरी देखील त्याला मोठ्या युक्तीनी आपल्या जवळ बोलावणं, त्याचं सैन्य आणि त्याचा अंगरक्षक त्याच्या पासून दूर करणं आणि मग त्याचं पोट फाडून त्याला संपवणं, हे अक्षरशः थक्क करून सोडणारं आहे. एखादं कठीण गणित आपल्याला 'logical deduction' या पद्धतीनी सोडवायला शिकवतात. म्हणजे एक एक equation सोडवत जायचं आणि हळूहळू गणित पूर्ण सुटतं. अफजलखानाचा प्रश्न महाराजांनी लॉजिकल deduction नी सोडवून दाखवला. असं म्हंटल्या जातं की, 'war is not played in the battlefield but in the minds of generals' अफझलखान युद्ध तर याचे अगदी मूर्तिमंत उदाहरण आहे.
सिद्धी जौहर च्या वेढ्याचं पण तसंच. त्याला 'मी शरण येणार आहे' म्हणून गाफील करणं आणि रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन पळून जाणं, अवघ्या ६०० मावळ्यांनिशी!!
महाराज ७८००० मोगलांच्या छावणीत फक्त ४०० मावळे घेऊन शिरतात काय आणि त्या शाहिस्तेखानाला ठार मारायचा प्रयत्न करून बिनभोबाट परत येतात काय....म्हणजे शाहिस्तेखान पारंपरिक युद्धात पराभूत होत नाही ना, मग सरळ त्याने अतिक्रमण केलेल्या लाल महालात शिरले आणि त्याला मारायचा प्रयत्न केला. पूर्ण यश आलं नाही, पण कार्यभाग साध्य झाला. आणि त्यानंतर मात्र, दूर आग्र्यात औरंगजेबानी कोंडलेलं असताना त्याच्या हातावर मिठाई ठेऊन, केलेलं पलायन म्हणजे तर अक्षरशः masterstroke होता.
यातून महाराज आपल्याला काय शिकवतात?
संकटाला कसं एकाकी पाडावं आणि त्यातून दिग्विजयी कसं व्हावं या गोष्टीची ही मूर्तिमंत उदाहरणं आहेत. जरा विचार करा, महाराज, ही संकटं आली त्या वेळेस गर्भगळीत होऊन गेले असते, तर काय झालं असतं हो? महाराज गर्भगळीत तर झाले नाहीतच, उलट मध्यंतरीच्या काळात त्यांनी सुरतेत जाऊन ती लुटून फस्त केली. का? तर या आक्रमणांनी झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी आणि साम्राज्यविस्तारासाठी. म्हणजे या संकटांमध्येही 'expansion' चा विचार सुरूच होता.
'emotional quotient' या गोष्टीचे शिवाजी महाराज म्हणजे गुरु आहेत, हे म्हणूनच मला वाटतं. या थोर जीवनातून रांगोळीच्या कणाएवढं जरी घेतलं तरी सारं साध्य होईल, झाल्याशिवाय राहणार नाही.

✍️देवाशीष विनोद सहस्रबुद्धे


Comments

Popular posts from this blog

नियतीचा क्रूर खेळ आणि रंगलेला कलगीतुरा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवार दि. २८ जानेवारी ला निधन झाले. स्वाभाविकच, राजकीय मतं विसरून लोकांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली. माध्यमांच्या समोर सतत येणाऱ्या सुप्रिया सुळे, रोहित पवार यांना पाहिले असता अशी शंका येत होती की आता पवार कुटुंबातीलच कोणीतरी म्हणजे मुख्यत्वे सुप्रिया सुळे याच दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची धुरा सांभाळतील. सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी पक्षातल्या काही नेत्यांनी अशी विधानं देखील केली की, दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशी अजितदादांची इच्छा होती. या सर्व घटनांना आता एक दोन दिवस उलटून गेलेत आणि आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी बातमी आली.  दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री या विषयाच्या संदर्भात एक प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस हे तोलून मापून बोलणारे आहेत त्यामुळे त्यांचं बोलणं नेहमीच लक्षवेधक असतं. ते म्हणाले, महाराष्ट्र सरकार म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्णपणे पाठीशी उभे राहू. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष" असा स्पष्ट उल्लेख त्यांनी आपल्या बोलण्यात केला. माझी रा...

कधी बहर कधी शिशिर

 डिसेंबर २०२४ मधली घटना आहे. महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपुरातल्या राजभवनाच्या हिरवळीवर पार पडला होता. पण, या नव्या मंत्रिमंडळात गेल्या वीस वर्षांपासून हमखास असलेले एक नाव मात्र नव्हते.  दुसऱ्या दिवशी या मंत्रिमंडळात वगळल्या गेलेल्या नेत्याने पत्रकारांशी बोलताना तीव्र नाराजी, दुःख आणि आपली खदखद व्यक्त केली. "जहाँ नहीं चैना, वहाॅं नहीं रहना" असं हा नेता बोलला.  आतापर्यंत आपल्या लक्षात आलंच असेल हा नेता कोण. कालांतराने म्हणजेच ५-६ महिन्यानंतर भुजबळ पुन्हा एकदा मंत्री झाले. हे सगळं आता आठवण्याचं कारण म्हणजे अजितदादा पवार यांच्या निधनानंतर घडलेल्या घटना आहेत.  अजितदादांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांना तातडीने जे शिष्टमंडळ भेटलं त्यात भुजबळ देखील होते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे या अजित पवारांच्या मर्जीतल्या शिलेदारांसोबत भुजबळ देखील दिसले. विधिमंडळ गटनेत्याची निवड कधी होईल वगैरे पत्रकारांना माहिती देखील भुजबळांनी दिली.  वर्षभरापूर्वी पक्ष सोडण्याची भाषा करणारे भुजबळ अजितदादांच्या मृत्यूनंतर आघाडीच्या नेत्यांपैकी एक दिसत होते. सत्त...

रमेश प्रभू, खिशातले राजीनामे आणि महिला आरक्षण विधेयक

१६ ते १८ एप्रिल दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते, ज्यामध्ये महिला आरक्षण विधेयकाची चर्चा झाली. विधेयक पारित व्हायला दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता होती, जे अर्थातच सरकारकडे नसल्यामुळे विधेयक पारित झाले नाही. या सर्व घटनांचा, पूर्वी घडलेल्या घटनांच्या आधारे धांडोळा घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बंगालच्या निवडणुकांपूर्वी मुद्दाम मोदींनी हे विधेयक संसदेत आणले आणि हाणून पडू दिले जेणेकरून बंगालच्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा त्यांना उचलता येईल असा कयास राजकीय पंडितांकडून वर्तवला जात आहे. एक प्रकारे महिला आरक्षण विधेयकावर मते मिळतात की नाही हे बंगालच्या निवडणुकांमधून भारतीय जनता पक्षाला चाचपून बघायचे आहे असे विश्लेषकांचे मत आहे.  हे घटनाचक्र बघितले असता १९८७ मध्ये झालेल्या विलेपार्ले येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आठवण येते. या निवडणुकीत सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांनी "गर्व से कहो हम हिंदू है" अशी घोषणा दिली होती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मिळतात की नाही हे बाळासाहेबांना चाचपून बघायचे होते आणि त्यासाठीच त्यांनी विलेपार्ले येथील पोटनिवडणुकीवर त्याचा प्रय...